Home पिंपरी चिंचवड दुर्गा अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दुर्गा अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड: कु. दुर्गा अभय भोर, अध्यक्षा, दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड महिला उद्योजक संघटना, यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दुर्गा अभियान’ अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, लघुउद्योग मार्गदर्शन आणि वृक्षारोपण असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले, ज्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिलांना आत्मसंरक्षणाची तंत्रे शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. कुमारी अवंतिका भोर आणि मोहसिना शेख यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच, भोसरी स्पाईन रोड दामिनी पथकाच्या सरस्वती काळे आणि मोनिका वरपे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लघुउद्योग मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री. अभय भोर यांनी महिलांना उद्योजकतेविषयी माहिती आणि प्रेरणा दिली, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल.

banner

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजात हरित संदेश पोहोचवण्यात आला. वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक दीपक साळुंखे, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि अनेक महिला उद्योजकांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कु. दुर्गा भोर यांच्या शुभहस्ते महिला कामगारांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाला बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती लावली. या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळून सामाजिक जाणीवा अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00