Home पुणे व्याजाने घेतलेले पैसे परत केल्याने सांगवीत एकाची गळफास घेत आत्महत्या…

व्याजाने घेतलेले पैसे परत केल्याने सांगवीत एकाची गळफास घेत आत्महत्या…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

सांगवी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- सांगवी परिसरात उसने दिलेल्या दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुनिल नारायण कोंडल (वय ५४, रा. गणेशनगर, सांगवी) याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी महिला (वय ५०, रा. विनायक नगर, लेन नं. १, नवी सांगवी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुनिल कोंडल यांनी फिर्यादी व त्यांचे पती उदय सुभाष तेलंग यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते. या रकमेसाठी दरमहा ३ टक्के व्याज देण्याचे तसेच सहा महिन्यांनी मूळ रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन स्टॅम्प पेपरवर दिले होते.

सुरुवातीला आरोपीने दरमहा ३० हजार रुपयांच्या दराने व्याजाची परतफेड केली; परंतु नंतर व्याज व मूळ रक्कम दोन्ही देणे बंद केले. पैसे मागणीस गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीला दमदाटी केली, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या मानसिक तणावामुळे उदय सुभाष तेलंग यांनी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सपोनि पाटील तपास करीत आहेत.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00