Home पिंपरी चिंचवड रक्तचंदन तस्करीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघांना नेरूळ येथून अटक; पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी

रक्तचंदन तस्करीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघांना नेरूळ येथून अटक; पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- कंटेनरमधून अवैधरित्या रक्तचंदन वाहतूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नेरुळ, नवी मुंबई येथून अटक केली.
राजेंद्र विठ्ठल शिंदे (४३, रा. वाशी, नवी मुंबई) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तसेच, त्याच्यासोबत कल्पेश सिंग म्हणून खोटं नाव सांगणाऱ्या तौसिफ रियाज जमादार (रा. कोपरखैरणे) यालाही अटक करण्यात आली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील एका कंटेनरमधून सुमारे ९ कोटींच्या रक्तचंदनासह दोन आरोपी पकडले होते. त्यांच्याविरुद्ध शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एकूण ६ आरोपी अटकेत आहेत. राजेंद्र शिंदे व कल्पेश सिंग (उर्फ तौसिफ) याचा पोलिस शोध घेत होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महायरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व पथकातील स्टाफ यांनी केली आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00