Home पिंपरी चिंचवड दोन कोटींपेक्षा अधिकची फसवणूक करणाऱ्यांना परराज्यातून अटक…

दोन कोटींपेक्षा अधिकची फसवणूक करणाऱ्यांना परराज्यातून अटक…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी चार राज्यांत कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि महाराष्ट्र ५००० किलोमीटरचा प्रवास करून सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी दोन ज्येष्ठ नागरिकांची एकूण २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली होती.

हे आरोपी स्वतःला ब्ल्यू डार्ट कुरिअर अधिकारी, मुंबई पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून सादर करत. त्यांनी व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हिडिओ कॉलवरून “डिजिटल अरेस्ट” केल्याचे भासवून, भीती दाखवत पैशांची मागणी केली.

एका प्रकरणात पीडितांकडून १ कोटी रुपये आणि दुसऱ्या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपये आरोपींनी उकळले. दोन्ही गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल असून, आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासानुसार आरोपींच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. प्रमुख आरोपी मोहम्मद आमेर अखील मोहम्मद आरीफ याच्या खात्यावर ७.८६ कोटी रुपयांचे व्यवहार, तर त्याचा ५८ कोटी रुपयांच्या इतर फसवणुकांमध्ये सहभाग असल्याचे आढळले. आणखी एक आरोपी जिगर पटेल याच्या खात्यावर ८.६७ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले.

banner

ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने केली. पथकाने अत्यंत तांत्रिक तपास करून आरोपींना पकडले.

ही मोहीम सायबर पोलिसांची कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाची यशस्वी उदाहरण मानली जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00