Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत..

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. काही ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेल्याने निवडणूक प्रक्रियेवर गभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. सोमवारी (दि. १७) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगावर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणी आता मंगळवारी (दि. २५) होणार आहे.

मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिस्थिती वेगळी असून, येथे आरक्षणाची रचना कायदेशीर मर्यादेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत शहरातील १२८ नगरसेवकांसाठी अनुसूचित जाती (एससी) २० जागा, अनुसूचित जमाती (एसटी) ३ जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी २७ टक्क्यांनुसार ३४ जागा राखीव आहेत. या आरक्षणांची एकत्रित टक्केवारी ४४ टक्के असून ती सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आरक्षणाच्या बाबतीत ‘सुरक्षित झोन’मध्ये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिकेने प्रभाग रचना अंतिम केली असून सुधारित आरक्षण सोडत जाहीर केली आहे. निवडणूक विभाग आज मतदार याद्याही प्रसिद्ध करणार आहे.

राज्यातील दोन महापालिका आणि अनेक नगरपंचायतींमध्ये ५०% मर्यादा ओलांडल्याने निवडणूक प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४४% आरक्षणामुळे स्थानिक निवडणूक वेळेत पार पडण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

banner

पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त नाही. त्यामुळे पिंपरी महापालिकेला याचा धोका नाही. राज्यातील दोन महापालिका आणि बाकी नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्याठिकाणी याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग मनपा…


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00