Home पिंपरी चिंचवड मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील रस्ता बाधित नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात; सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन

मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील रस्ता बाधित नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात; सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Citizens affected by roads in Mohannagar, Ramnagar, Kalbhornagar should register as many suggestions and objections as possible; appeal from all party leaders
Spread the love

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा (डिपी) जाहीर केला असून यामध्ये विविध रस्ते व विविध आरक्षणाबाबत नागरी वस्तीतील अनेक घरे, दुकाने भविष्यात बाधित होणार आहेत. या विकास आराखड्याबाबत सूचना व हरकती घेण्याची मुदत ६० दिवसाची असून ती १८ जुलै २०२५ पर्यंत आहे. तरी मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील रस्ता बाधित नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
विकास आरत्या बाबत सूचना व हरकती घेण्यासाठी मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुरामनगर या भागात मसुदा फार्म वाटप करण्यात आला होता. तो नीट वाचून त्यात काही बदल करायचा असेल तर तो करून प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत या हरकतीवर स्वाक्षरी करून आप आपली हरकत नोंदवावी अशी विनंती स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती.
दरम्यान दोन बैठकांमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे आज सोमवार दि.२३ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात मोहननगर, रामनगर, दत्तनगर, कळभोरनगरच्या नागरिकांनी एकत्रित येत मोठ्या संख्येने व्यक्तिगत सूचना व हरकती नोंदवल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, प्रसाद शेट्टी, महादेव नेरलेकर, दत्ता देवतरासे, सोमनाथ अलंकार, बापूसाहेब हाके, प्रसाद दौंडकर, राजू पाटील, सलीम शेख, रोप शेख, श्रीजीत पिल्ले हभप डोके महाराज, वलवणकर काका, सावंत मामा, लोणकर वहिनी, आदि प्रमुख कार्यकर्ते व नागरिक महापालिका मुख्यालयात उपस्थित होते.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00