Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २२ प्रभागांमध्ये महायुतीची लढत..

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २२ प्रभागांमध्ये महायुतीची लढत..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. 8 नोव्हेंबर 2025) :- महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हायब्रीड युती’चा फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. ज्या प्रभागांमध्ये महायुती म्हणून लढणे शक्य आहे, तेथे युती होईल; तर उर्वरित ठिकाणी स्वबळावर लढत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते शुक्रवारी (दि. ७) महापालिकेच्या प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या निवडणुका शक्यतो महायुती म्हणूनच लढवल्या पाहिजेत. मात्र ज्या ठिकाणी ते शक्य नाही, तेथे ‘हायब्रीड युती’ म्हणजे काही प्रभागांमध्ये युती व काही ठिकाणी स्वबळावर लढणे हा पर्याय निवडावा.”

ते पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग आहेत. त्यापैकी किमान २२ प्रभागांमध्ये युती आणि उर्वरित १० ठिकाणी स्वबळावर लढल्यास चालेल. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे त्या पक्षाने स्वतंत्र लढावे. पण निवडणुकीचा मुख्य चेहरा महायुतीचाच राहील.”

यावेळी पार्थ पवार यांच्या कथित जमीन प्रकरणावरही पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, “हा घोटाळा मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपाने उघड केला नाही. काही प्रकरणे नैसर्गिकरित्या समोर येतात, ती लपवली जात नाहीत. चौकशी होणारच, पण त्याचा राजकीय हेतू नाही.”

banner

मंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असून, स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करतील.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00