Home पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक १० ओबीसी महिलेसाठी राखीव..

प्रभाग क्रमांक १० ओबीसी महिलेसाठी राखीव..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड(दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली असून, प्रभाग क्रमांक १० हा ओबीसी महिलांसाठी राखीव ठरला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला मोर्चात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रोहिनीताई रासकर यांच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये एकमेकींना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सविता निकाळजे, रेश्मा भीमा कुराडे, छाया रवी बनसोडे, समिना जावेद पठाण, ममता खूशवाह,मायावती मोतिरावे ,सरिता खुशवाह,हीना शेख, सुजाता साखरे, पुष्पा बाबर,शांताबाई गायकवाड, अनिता यादव,सुनीता भालेराव,मनीषा बाराई, शोभा गायकवाड, गंगुबाई दोडमानी, ऋतुजा बल्लाळ,सुजाता ढेंडे, इंदुबाई ओव्हाळ,अरुणा कांबळे, शमिका मोरे,रेश्मा सूर्यवंशी, समानी अब्दुलमतीन,मुमताज शेख,यश्मिन कुरेशी,बेनू यादव,दिपाली केंगारे, रिता कुशावाह ,पूजा यादव, बेनु यादव लीला कुशवाह, रीता कुशवाह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

रोहिणीताई नेहमी सर्वसामान्य महिलांच्या समस्यांसाठी तत्पर असतात. समाजातील वंचित घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. महिलांच्या सर्व अडीअडचणीत 24 तास उभ्या असलेल्या रोहिणी ताई त्यांचे नेतृत्व म्हणजे प्रेरणादायी शक्ती आहे महिलांसाठी. त्या संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण आहेत. महिलांसाठी गरजूंसाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आणि विकासाच्या दृष्टीने केलेले कार्य आज सर्वांसाठी आदर्श आहे.प्रभाग १० मध्ये ओबीसी महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने प्रभागातील विकासाला चालना मिळेल आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्मविश्वासाने पुढे जात आहोत अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त करून परस्परांचे अभिनंदन करत आगामी निवडणुकीसाठी जोमाने तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00