Home पिंपरी चिंचवड स्थानिक राजकारण की पक्षाची धोरणात्मक चूक? संतोष म्हस्के प्रकरणाने भाजपसमोर प्रश्नचिन्ह

स्थानिक राजकारण की पक्षाची धोरणात्मक चूक? संतोष म्हस्के प्रकरणाने भाजपसमोर प्रश्नचिन्ह

स्थानिक राजकारण की पक्षाची धोरणात्मक चूक? संतोष म्हस्के प्रकरणाने भाजपसमोर प्रश्नचिन्ह

by Lokmauryanews@gmail.com
0 comments

Table of Contents

Spread the love

पिंपरी चिंचवड दिनांक:31 गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे प्रभाग क्रमांक १६ मधील निष्ठावान कार्यकर्ते संतोष म्हस्के यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही चूक केली का?” असा थेट आणि आर्त सवाल त्यांनी उपस्थित केल्याने चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संतोष म्हस्के हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे खंबीर व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अश्विनीताई जगताप यांच्या विजयासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही आमदार शंकर जगताप यांच्या प्रचारात मुख्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मात्र, एवढ्या वर्षांची निष्ठा, सातत्यपूर्ण काम आणि संघटनेसाठी दिलेले योगदान असूनही उमेदवारी देताना त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवारी न मिळाल्याबाबत बोलताना संतोष म्हस्के यांनी थेट आरोप करत सांगितले की, “काही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक राजकारण करून मला उमेदवारीपासून वंचित ठेवले. पक्षासाठी रक्त आटवले, संघटना मजबूत केली; पण संधी देण्याची वेळ आली तेव्हा स्थानिक हेवेदाव्यापोटी मला डावलण्यात आले. हे मी कदापि मान्य करणार नाही.”

दहा वर्षे पक्षाशी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न देणे हा केवळ माझा नव्हे, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, शिस्त पाळली; ही आमची चूक ठरली का?” असा सवाल त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर उपस्थित केला आहे.

संतोष म्हस्के यांच्या या जाहीर पवित्र्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00