Home पिंपरी चिंचवड भरधाव ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेले..

भरधाव ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेले..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 14फेब्रुवारी 2026) :- देहू ते आळंदी मार्गावर जाधववाडी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा अपघात ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता मधुबन हॉटेलसमोर घडला. ट्रक चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात वाहन चालवत पुढे जाणाऱ्या पल्सर दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडला आणि ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली.

या अपघातात अनिल पांडुरंग कांबळे (वय २५) यांचा डोक्याला, हाताला व पायाला गंभीर मार लागून मृत्यू झाला. ते फिर्यादी सुनिल पांडुरंग कांबळे (वय २९, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांचे भाऊ होते. सुनिल कांबळे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सपोफौ पारधी करीत आहेत.

banner

दरम्यान, देहू-आळंदी मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार असून, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00