Home पिंपरी चिंचवड हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा; आमदार शंकर जगताप यांचा ठाम पाठिंबा

हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा; आमदार शंकर जगताप यांचा ठाम पाठिंबा

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

हिंजवडी :- हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन सह्यांच्या मोहिमेला आता राजकीय पाठबळ मिळाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी या मोहिमेला ठाम शब्दांत पाठिंबा जाहीर केला असून, “या प्रश्नावर मी हिंजवडीतील नागरिकांच्या सोबत आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात सध्या नागरिक व आयटीयन्स रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाय व्हावा, यासाठी वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संस्थेचे (WPRDWA) अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या पुढाकाराने #UNCLOGHinjawadiITPark या मोहिमेंतर्गत ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमार्फत हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी म्हटले की, “हिंजवडीतील नागरिक आणि आयटीयन्स प्रश्न मी समजून घेतले आहेत. या भागातील नागरी सुविधांची अवस्था अत्यंत वाईट असून, त्यावर पालिकेच्या माध्यमातूनच प्रभावी उपाय होऊ शकतात. म्हणूनच मी या मागणीचे पूर्ण समर्थन करतो आणि यासंदर्भात प्रशासनाकडेही पाठपुरावा करणार आहे.”
ऑनलाईन सह्यांची ही मोहीम नागरिकांच्या सहभागामुळे दिवसेंदिवस बळकट होत आहे. यामध्ये सहभागी झालेले नागरिक सांगतात की, हिंजवडीसारखा आयटी हब महानगरपालिका क्षेत्रात आला तर रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील. यामुळे लाखो आयटीयन्सना दिलासा मिळेल, तसेच आयटी उद्योगांच्या विकासालाही चालना मिळेल.
या मागणीला आता आमदार शंकर जगताप यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे या आंदोलनाला नवे राजकीय वजन प्राप्त झाले आहे. लवकरच या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाकडे अधिकृत निवेदन देण्यात येणार असून, नागरिक प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करत आहेत.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00