Home पिंपरी चिंचवड म्हाडा गृहनिर्माण सोसायटीचा पाणी प्रश्न सुटला..

म्हाडा गृहनिर्माण सोसायटीचा पाणी प्रश्न सुटला..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी येथील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सोसायटीला नवीन तीन पाण्याच्या लाईनचे कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे सध्या रहिवाशांना दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे.

या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निकाला संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी सतत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मा. उपमहापौर व स्थायी समितीचे मा. सभापती हिरानंद उर्फ ‘डब्बू’ आसवानी यांनी दिली. “हा प्रश्न लवकरच पूर्णपणे निराकरण होईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी सोसायटीतील ज्येष्ठ दिले.

नागरिकांच्या विविध अडचणींचाही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. तसेच म्हाडा गृहनिर्माण संस्थेमार्फत अपुऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक “सोसायटीतील चर्चा केली. राहणीमान सुधारण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.” असे आश्वासन मा.उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी दिले. स्थानिक रहिवाशांनी पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने सोसायटीमध्ये आनंद व्यक्त करत मा.उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांचे आभार मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00