Home पिंपरी चिंचवड रस्त्यावर पडताच अंगावरून गेले कंटेनरचे चाक; मदतीसाठी नागरिक धावले..

रस्त्यावर पडताच अंगावरून गेले कंटेनरचे चाक; मदतीसाठी नागरिक धावले..

पण रोहिणीची जीवनाशी झुंज अपुरीच ठरली.. चाकण येथील तळेगाव चौक परिसरातील दुर्दैवी घटना…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चाकण येथील तळेगाव चौक परिसरात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंटेनरच्या धडकेत महिला रस्त्यावर कोसळली आणि तिच्या पाय व कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे हा भीषण अपघात घडला. कंटेनर चालकाने वाहन डाव्या बाजूने नेत असताना महिलेला धडक दिली. धडकेनंतर महिला रस्त्यावर पडली आणि कंटेनरचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला. अॅम्ब्युलन्स चालक साईनाथ माकणे आणि स्थानिक नागरिकांनी तिला त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी संबंधित महिलेची ओळख रोहिणी हिरासिंग दुरवेरा (रा. आंबेठाण, ता. खेड) अशी पटवून दिली. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, परंतु मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी (दि. १५ जून) पहाटे दीडच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

banner

अपघातप्रकरणी कंटेनर चालक शंकर बळीराम जाधव (रा. रांजणगाव, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00